ऊर्जामंत्री देवेंद्र फडणविसांच्या अलगर्जी पणामुळे कृषिपंप धारक शेतकऱ्यांवर ओढावला संकट
गडचिरोली जिल्ह्यातील काही मोजकेच फिडर असे आहेत की,त्या फिडर मध्ये मोडणाऱ्या शेतकऱ्यांना भारनियमनाचा फटका बसत आहे. बाकी सर्व जिल्ह्यात आलबेल परिस्थिति आहे आणि भारनियमनाचा फटका ज्या शेतकऱ्यांना बसला ते शेतकरी मात्र डबगाईस आले हिच परिस्थिति कृषि पंपधारकांवर आली आहे.
- भेंडाळा सबस्टेशनवर कृषिपंपधारकांचा मोर्चा
चामो तालुक्यातील भेंडाळा सबस्टेशन अंतर्गत येणारे घारगांव आणि कळमगांव या दोन फिडरचे मिळून एकूण १६ गांव आहेत आणि १६ गावानांच भारनियमनाचा सर्वात जास्त फटका कृषिपंपधारक शेतकऱ्यांना बसला असून या भागातिल शेतकरी हतबल झाला होता म्हणूनच चमोर तालुक्यातील भेंडाळा सबस्टेशन अंतर्गत येणारे कृषिपंपधारकांनी सबस्टेशनवर आक्रोश मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करून महाराष्ट्र शासना विरुद्ध आपला रोष प्रगट केला होता,जो पर्यंत मागणी मान्य होणार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,या मागणीवर कृषिपंपधारक ठाम होते.
तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन दिले आणि त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले परंतु कृषिपंपधारकांचा काहीच फायदा झाला नाही. आठ तासांचे जे काही वीज देत होते,ती जैसे थे आहे आणि हे लक्षात आल्यावर मग कुठं नाईलाजाने कृषिपंपधारकांना आक्रोश मोर्चा काढून महाराष्ट्र सरकार विरोधात तीव्र नाराजी प्रकट करून आपला आक्रोश व्यक्त करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील मोजक्याच ठिकाणी भारनियमन सुरू असून ते बंद करण्यात यावे या मागणीचे निवेदन राज्याचे ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या नागपूर येथील राहत्या घरी आणि खास विजयादशमीच्या दिवशी कृषिपंपधारक शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि स्वता फडणविसांनी २४ तासांची मागणी मान्य करीत १२ तास वीज कृषिपंप धारकांना देण्याची तयारी दर्शवली होती.
आणखी वाचा : जन आंदोलन शिवाय पर्याय नाही,कृषिपंप धारकांना रमेश चौखूंडेचे आव्हान
परंतु ऊर्जामंत्री फडणवीस दिलेला शब्द पाळू शकले नाहीत म्हणजे कृषिपंप धारकांना जि आठ तास वीज मिळत होती,तिच मिळत राहिली आणि भारनियमणा मुळे कृषिपंप धारकांना मोठा फटका बसला आणि पीक हातातून गेला,एवढी नामूस्की कृषिपंप धारक शेतकऱ्यांवर आली.
आणखी वाचा : पुन्हा आंदोलन उभे करू कृषि पंपधारकांचा सरकारला इशारा
- शेतकरी शिष्टमंडळ आणि ऊर्जामंत्री फडणवीस
गडचिरोली जिल्ह्यातील मोजक्याच ठिकाणी भारनियमन सुरू असून ते बंद करण्यात यावे या मागणीचे निवेदन राज्याचे ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या नागपूर येथील राहत्या घरी आणि खास विजयादशमीच्या दिवशी कृषिपंपधारक शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि स्वता फडणविसांनी २४ तासांची मागणी मान्य करीत १२ तास वीज कृषिपंप धारकांना देण्याची तयारी दर्शवली होती.
आणखी वाचा : जन आंदोलन शिवाय पर्याय नाही,कृषिपंप धारकांना रमेश चौखूंडेचे आव्हान
परंतु ऊर्जामंत्री फडणवीस दिलेला शब्द पाळू शकले नाहीत म्हणजे कृषिपंप धारकांना जि आठ तास वीज मिळत होती,तिच मिळत राहिली आणि भारनियमणा मुळे कृषिपंप धारकांना मोठा फटका बसला आणि पीक हातातून गेला,एवढी नामूस्की कृषिपंप धारक शेतकऱ्यांवर आली.
- १२ तास वीज मिळाली असती,तर पीके गेली नसती
आणखी वाचा : पुन्हा आंदोलन उभे करू कृषि पंपधारकांचा सरकारला इशारा
- १२ तास वीज आता दिवसांसाठी
आता राज्याचे ऊर्जामंत्री फडणविसांनी आता दोन दिवसांपूर्वी कृषिपंप धारकांना ८ तासांवरून १२ तासांची वीज उपलब्ध करून दिली परंतु ती १२ तास मिळणारी वीज किती दिवसांसाठी आहे,असा प्रश्न कृषिपंप धारक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आता मिळणारी १२ तासांची वीज कायम स्वरूपी मिळणार आहे की,ते औत घटकेचीच आहे,असा प्रश्न कृषिपंप धारक शेतकरी दबक्या आवाजात एकमेकांना विचारीत आहे.
0 टिप्पण्या